एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ 3 प्रलंबित मागण्या पूर्ण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या तब्बल तीन मागण्या पूर्ण झाल्या आहेत.

Published on -

ST Workers News : जर तुम्हीही एसटी महामंडळाचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी एस टी महामंडळात कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या पूर्ण होणार आहेत अशी घोषणा केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतका वाढणार

 सद्यस्थितीला केंद्रातील कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली असून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे.

दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही 53% दराने महागाई भत्ता मिळतोय. राज्य कर्मचाऱ्यांसाठी जुलै 2024 पासून 53 टक्के महागाई भत्ता लागू आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता वाढ मिळणे अजून बाकी आहे. पण येता काही दिवसात हा महागाई भत्ता वाढेल.

दुसरीकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अजूनही 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. मात्र आता हा महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांच्या धरतीवर चक्क 53% होणार आहे आणि याचा लाभ जून महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीदरम्यान केली आहे.

या 2 प्रलंबित मागण्या झाल्यात पूर्ण

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना “महात्मा फुले जन आरोग्य योजना” व “आयुष्यमान भारत” या एकत्रित योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळणार अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

तसेच “धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना” ही पर्यायी योजना सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजेच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना या दोन्हीपैकी एक योजना निवडता येईल आणि त्याचा लाभ घेता येणार आहे. कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार या योजना निवडू शकतात.

याशिवाय, कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात मोठा निर्णय झालाय, तो म्हणजे स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास एक कोटी, पूर्ण अपंगत्व आल्यास एक कोटी, तर अंशतः अपंगत्वास 80 लाखांचा लाभ मिळणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे कामावर असताना किंवा नसताना दोन्ही प्रकरणांमध्ये हा लाभ लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे तो म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला एसटीत वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी मोफत पास दिला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!