Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्गाचे चार पदरीकरण होणार आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका मार्गाचे चार पदरीकरण होणार असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
खरंतर, नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे आणि याच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातील सनातनी हिंदू भाविक श्रीक्षेत्र नाशिक येथे गर्दी करणार आहेत. दरम्यान कुंभमेळासाठी नाशिक येथे येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे सुद्धा दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

यामुळे साहजिकच शिर्डी ते नाशिक दरम्यानच्या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढेल आणि येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. दरम्यान, हीच वाहतूक कोंडी सोडवण्याचे अनुषंगाने शिर्डी ते नाशिक दरम्यानच्या मार्गाचे विस्तारीकरण केले जाणारे असून यासाठी 230 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झाला आहे.
हा मार्ग चारपदरी होणार
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान अनेक भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूरला दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे आणि यामुळे शिर्डी – वावी – पांगरी – सिन्नर – नाशिक या मार्गावर वाहतूक कोंडी होईल असे बोलले जात आहे.
यामुळे शिर्डी – नाशिक म्हणजेच निर्मळ पिंपरी – निमोण – नाशिक या 22 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे चार पदरीकरण केले जाणार आहे. सध्या हा महामार्ग दूपदरी आहे. म्हणजे राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी – निमोण – तळेगाव दिघे व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे यादरम्यानचा रस्ता चार पदरी होईल.
यासाठी 165 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर झाला आहे. दरम्यान निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर येत्या महिन्याभरात या मार्गाचे काम सुरू होणार असल्याची खात्रीलायक बातमी सुद्धा प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
जुना नाशिक मार्ग थेट शिर्डी विमानतळापर्यंत
यासोबतच जुना नाशिक मार्ग थेट शिर्डी विमानतळा सोबत जोडला जाणार असून यासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थातच या 75 कोटी रुपयांच्या खर्चातून जुना नाशिक मार्ग म्हणजेच लोणी ते कोल्हार दरम्यानच्या रस्त्याचे विस्तारीकरण होणार असून हा मार्ग थेट शिर्डी विमानतळापर्यंत नेला जाणार आहे.
रस्त्याची लांबी एकूण 13 किलोमीटर एवढी राहणार आहे आणि हा रस्ता तीन पदरी केला जाणार आहे. याचा अर्थ या दोन्ही मार्गांसाठी एकूण 230 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यातून शिर्डी ते नाशिक हा प्रवास वेगवान बनवण्याचा प्रयत्न आहे.
या दोन्ही मार्गांच्या विस्तारीकरणामुळे शिर्डी – वावी – पांगरी – सिन्नर – नाशिक या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर होईल आणि भाविकांना जलद गतीने नाशिक ते शिर्डीदरम्यानचा प्रवास करता येईल.