Toll News : देशभरातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकार लवकरच टोल वसुली बाबत नवा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
महामार्गांवरून प्रवास करताना आता सर्वसामान्य वाहनचालकांचा वेळ वाचावा यासाठी सरकारच्या माध्यमातून टोल वसुलीबाबतच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या वर्षात टोल प्लाजा वरील टोल वसूल करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मिळणार आहे.
केंद्र सरकार आता टोल वसुलीची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन बनवणार आहे. आता वाहन चालकांना फक्त कॅशलेस पद्धतीने टोल भरता येणार आहे.
फास्टटॅग किंवा मग युपीआयच्या माध्यमातून वाहन चालकांना टोल भरता येणार आहे. नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर टोल प्लाजा वर कॅश घेतली जाणार नाही.
निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात
केंद्रातील सरकारकडून हा नवा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून लागू केला जाईल अशी शक्यता आहे. मार्च नंतर हे नवे नियम लागू होणार असे बोलले जात आहे.
नव्या निर्णयामुळे वाहनचालकांना फोन पे, गुगल पे, भीम यूपीआय अशा एप्लीकेशन्स किंवा फास्टॅगद्वारेच टोल भरावा लागणार असा आहे. ही सेवा वेळ वाचवण्यासाठी महत्वाची ठरेल.
भविष्यात वाहनचालकांना यांचा चांगला फायदा मिळणार आहे. तुम्हाला येत्या काळात टोल नाक्यावर जास्त वेळ अडकून राहावे लागणार नाही. केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या सचिवांनी याबाबत माहिती दिली आहे.
तारीख लवकरच जाहीर होणार
यूपीआयवरुन टोल भरण्याची सुविधा सगळ्या देशात सुरु आहे. त्याला चांगली पसंती सुद्धा मिळतं आहे. तसेच आता सरकारने टोल नाक्यावर कॅश व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हे नवे नियम अद्याप लागु नाहीत. कदाचित 1 एप्रिलनंतर याची अंमलबजावणी होईल.













