Top Engineering Colleges : गेल्या महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठीची लगबग देखील सुरू झाली. बारावी बाबत बोलायचं झालं तर बारावीचा निकाल हा दहावीचा निकालाच्या आधीच जाहीर करण्यात आला.
बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला असून त्यानंतर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये तसेच इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लगबग करताना दिसू लागलेत. खरे तर बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांशी विद्यार्थी मेडिकलला तसेच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात.

दरम्यान जर तुम्हाला ही बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर इंजीनियरिंग करायचे असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची राहणार आहे. कारण म्हणजे आज आपण देशातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस ची माहिती पाहणार आहोत.
जर तुम्ही या दहा पैकी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवलं तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा मिळणार आहे आणि तुमचे करिअर खऱ्या अर्थाने सेट होईल असं आपण म्हणू शकतो.
हे आहेत देशातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस
देशातील टॉप 10 मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये महाराष्ट्रातील एका आयआयटी चा समावेश होतो. सुरुवातीच्या टॉप तीन इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये आयआयटी बॉम्बेचा सुद्धा समावेश केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचे असेल तर तुम्ही आयआयटी बॉम्बे चा विचार करायला हवा.
जर तुम्हाला आयआयटी बॉम्बे मध्ये ऍडमिशन मिळाले तर नक्कीच तुमच आयुष्य सेट होणार आहे. येथून इंजिनिअरिंगची डिग्री मिळवलेल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळते त्यामुळे जर तुम्हीही येथून डिग्री मिळवली तर तुम्हालाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच लाखो रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.
आयआयटी मद्रास
आयआयटी बॉम्बे
आयआयटी रूडकी
आयआयटी गुवाहाटी
आयआयटी हैदराबाद
एनआयटी त्रिची
आयआयटी बीएचयु
आयआयटी दिल्ली
आयआयटी कानपूर
आयआयटी खडगपूर
वर सांगितलेले दहा कॉलेजेस देशातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यातील आयआयटी मद्रास हे कॉलेज गेल्या काही वर्षांपासून शीर्ष स्थानावर विराजमान आहे. यामुळे या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावे यासाठी विद्यार्थी अहोरात्र काबाडकष्ट करताना दिसतात.
कारण की या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. प्रवेश परीक्षेत चांगले गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या टॉपच्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळते. त्यामुळे जर तुम्हालाही वर सांगितलेल्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळवायचे असेल तर तुमचे प्रवेश परीक्षेचे गुणदेखील तेवढेच चांगले असणे आवश्यक आहे.