Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र भ्रमण करत असतात. नवग्रहांचे बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण होत असते. याशिवाय ठराविक कालावधीनंतर ग्रहांचा उदय आणि अस्तही होतो.
दरम्यान या घटना घडत असतानाच काही शुभ आणि अशुभ योगाचीही निर्मिती होते. ग्रहाच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनाच्या तसेच अस्त आणि उदयाच्या घटनांमुळे मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

दरम्यान पुढील महिन्यात अशाच एका योगाची निर्मिती होणार आहे ज्यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकटाचे दिवस येऊ शकतात. या संबंधित राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता समाप्त होईल आणि वाईट काळ सुरू होण्याची शक्यता आहे.
तीन जून 2025 रोजी हा योग तयार होणार
3 जून 2025 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शनि आणि सूर्यग्रहामध्ये 72° चा कोण तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून पंचक योग तयार होणार आहे.
ज्योतिष तज्ञ सांगतात की जेव्हा शनी आणि सूर्य या दोन्ही ग्रहांमध्ये 72 डिग्रीचा कोण तयार होतो त्यावेळी पंचक योग तयार होतो आणि याचा वाईट प्रभाव राशीच्या घरातील काही राशीच्या लोकांवर पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत आता आपण तीन जून नंतर कोणत्या राशीच्या लोकांसाठी संकटाचा काळ सुरू होईल याचा आढावा घेणार आहोत.
या राशीच्या लोकांचा संकटाचा काळ सुरु
कुंभ : या राशीच्या लोकांचा स्वर्ण काळ आता संपू शकतो आणि आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग या लोकांना अनुभवायला मिळणार आहे. यामुळे 3 जून 2025 पासून या लोकांनी अधिक संयम आणि शहाणपणाने वागायला हवे असे तज्ञांचे म्हणणे आहे.
या काळात या लोकांनी आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही कामात घाई करू नये अन्यथा चुकीचा निर्णय होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत देखील या लोकांनी अधिक सावधगिरीने काम करायला हवे. जिथे जोखीम आहे तिथून लांब राहावे. कुटुंबात होणारे मतभेद टाळण्याचा प्रयत्न करावा.
तूळ : कुंभ राशी प्रमाणेच 3 जून पासून तुळ राशीच्या लोकांचाही कठीण काळ सुरू होणार आहे. ज्योतिष तज्ञ असे सांगतात की आगामी काळात या लोकांनी गुंतवणुकीच्या संदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. या काळात या लोकांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा. गोड बोलून काम केल्यास या लोकांना फायदा होणार आहे तसेच नाते टिकवण्यास मदत होईल.
या लोकांनी आपली थिंकिंग इतरांवर थोपवता कामा नये याउलट शांततेने संवाद साधता आला तर हे लोक चांगली प्रगती साधू शकतात. या लोकांनी आपल्या गुप्त योजना उघड करू नये अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. धोरणात्मक निर्णय या काळात फायद्याचे ठरण्याची शक्यता आहे पण योजना गुप्त असावी.
मिथुन : वर सांगितलेल्या दोन्ही राशींप्रमाणेच मिथुन राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता सुरू होणार आहे. या लोकांना कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी तणावाचा अनुभव येऊ शकतो. या काळात या लोकांनी आपल्या गैरवर्तन करू नये, असभ्य वागणुकीने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष तज्ञ सांगतात.
या लोकांनी या काळात आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच अनावश्यक खर्च सुद्धा या काळात होणार नाही याची काळजी या लोकांनी घ्यायला हवी. आरोग्याच्या संदर्भातही या लोकांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. परंतु या लोकांना या काळात आपल्या आईकडून चांगले प्रेम मिळेल आणि हे मातृप्रेम या लोकांना मानसिक आधार देऊ शकते.