Airtel-Vi-BSNL ला मागे टाकत Reliance Jio ने पुन्हा मारली बाजी

Published on -

Reliance Jio : रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये आपली वाढ आणखी मजबूत केली आहे. कंपनीने मे महिन्यात 31 लाखांहून अधिक नवीन मोबाइल ग्राहक जोडले. ट्रायच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलने मे महिन्यात 10.27 लाख नवीन ग्राहक जोडले. यानंतर त्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या 36.21 कोटी झाली आहे.

रिलायन्स जिओने 31.11 लाख नवीन ग्राहक जोडले

ट्रायच्या मासिक डेटानुसार, रिलायन्स जिओने मे महिन्यात 31.11 लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले. आता त्याच्या मोबाईल ग्राहकांची संख्या 40.87 कोटींवर पोहोचली आहे. याच कालावधीत व्होडाफोन-आयडियाचे ७.५९ लाख कनेक्शन तुटले आहेत. त्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या 25.84 कोटींवर आली आहे.

एअरटेलने 8 लाख नवीन ग्राहक जोडले

जिओने एप्रिलमध्ये 16.8 लाख वायरलेस ग्राहक जोडले, तर भारती एअरटेलने 8.16 लाख नवीन ग्राहक जोडले. मे महिन्यात देशातील टेलिफोन ग्राहकांची संख्या सुमारे 117 कोटी होती, तर एप्रिल 2022 मध्ये ही संख्या 1167 कोटी होती.

ट्रायने सांगितले की, “शहरी टेलिफोन ग्राहकांची संख्या या वर्षी एप्रिलच्या अखेरीस 64.69 कोटींवरून मे अखेरीस 64.78 दशलक्ष झाली आहे. याच कालावधीत ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या52.08 कोटींवरून 52.29 कोटी झाली आहे. BSNL ने मे महिन्यात 5.36 लाख वायरलेस ग्राहक गमावले तर महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ने 2,665 सदस्य गमावले.

31 मे 2022 पर्यंत वायरलेस मार्केटमध्ये खाजगी कंपन्यांचा हिस्सा 89.9 टक्के होता, तर सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपन्या BSNL आणि MTNL यांचा केवळ 10 टक्के बाजार हिस्सा होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News