नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.
पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे.

खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यामुळे सुजय विखे यांना सुरेंद्र गांधीची अडचण होणार अशी चर्चा रंगत असतानाच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक खा गांधींची भेट घेऊन धक्काच दिला. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले.
दरम्यान खा गांधी यांनी आपण पक्षाशी एक निष्ठ असल्याचे सांगितले. पण त्या नंतर सुरेंद्र गांधीनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले होते.
खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज (दि.४) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाने खा.दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा.गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे.
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात
- महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर
- 10% मुंबई आहे बापाची ! ‘हे’ कुटुंब आहेत मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, 3400 एकर जमिनीचे मालक
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ दोन वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 750 रुपयांची शिष्यवृत्ती
- …….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !
- केंद्रीय कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली गुड न्यूज ! ‘या’ तारखेला Pm Kisan चा 21 वा हफ्ता जमा होणार, नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार
- पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘या’ धरणावर तयार होणार आठपदरी पूल, 82 गावांमधील नागरिकांना होणार फायदा