नगर : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी करण्याची घोषणा केल्यानंतर खा.दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी यांनी आता ‘यु टर्न’ घेतला आहे.
पक्षाचा आणि खा.दिलीप गांधी यांचा आदेश मानून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे सुवेंद्र गांधी यांनी निर्णय घेतला आहे.

खा. दिलीप गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यामुळे सुजय विखे यांना सुरेंद्र गांधीची अडचण होणार अशी चर्चा रंगत असतानाच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अचानक खा गांधींची भेट घेऊन धक्काच दिला. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आले.
दरम्यान खा गांधी यांनी आपण पक्षाशी एक निष्ठ असल्याचे सांगितले. पण त्या नंतर सुरेंद्र गांधीनी आपण आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे सांगितले होते.
खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी आज (दि.४) सुवेंद्र गांधी यांनी निवडक कार्यकर्ते व पदाधिकार्यांची बैठक घेऊन ही घोषणा केली. यावेळी संघटन सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह नगर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाने खा.दिलीप गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा सन्मान राखला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खा.गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण उमेदवारी करणार नसून, निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराचे काम सर्वांना करायचे आहे.
- शेतकऱ्यांच्या कामाचा मोबाईल नंबर ! पीएम किसानचा २१वा हप्ता आला नाही तर ‘या’ नंबरवर करा तक्रार
- म्हाडा पुणे मंडळाचा पुन्हा मोठा निर्णय ! ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास अजून मिळाली मुदतवाढ, नवीन तारीख पहा….
- सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारा महागाई भत्ता, प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्ता नव्या वेतन आयोगात बंद होणार का ? समोर आली नवीन अपडेट
- महाराष्ट्राला मिळणार एक नवा सहापदरी महामार्ग ! पायाभूत समितीची मंजुरी, नवा Greenfield Expressway समृद्धीला जोडला जाणार
- लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही ? आता घरबसल्या पाहता येणार, पहा…
- मुंबई – छत्रपती संभाजी नगर वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार ? राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट
- विधवा महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती सासरच्या लोकांना मिळणार की माहेरच्या ? सुप्रीम कोर्टाचा थक्क करणारा निर्णय काय?













