अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- ‘या’ 5 शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु करा अन पुढील 12 महिन्यात दमदार रिटर्न मिळवा, आनंद राठीच्या पसंतीचे टॉप स्टॉक
- पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! एका झटक्यात 31 लाख लाभार्थ्यांना योजनेतून वगळलं
- महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये दिवाळी बोनस, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट
- ‘या’ कंपनीच्या एका शेअरवर मिळणार एक शेअर फ्री ! गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
- Tata समूहाचा ‘हा’ शेअर 90 टक्क्यांनी घसरला, घसरणीनंतरही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले नाही, कारण….