अहमदनगर : बाळासाहेब विखे आणि पवार यांचे वैर नव्हते. अलीकडे राजकारणासाठी त्यांच्यातील वादाचा गवगवा केला जात आहे. प्रवरा परिसरात या विखे कुटुंबियांची हिटलरशाही चालते.
त्यांच्या शिफारशीशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यांनी सख्या भावाला एवढा त्रास दिला आहे, तर इतरांची काय व्यथा, अशी टीका डॉ. अशोक विखे यांनी केली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरचे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. त्यामध्ये डॉ. अशोक विखे यांचे भाषण झाले.
वडिलांचे आजारपण, अंत्यविधी, डॉ. विखे यांची वैद्यकीय पदवी अशा अनेक गोष्टींसंबंधी त्यांनी अनेक अरोप केले. ते म्हणाले,
बाळासाहेब विखे आजारी असताना त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी डॉ. सुजय यांनी पाच डॉक्टरांनी दिलेला सल्ला डावलून त्यांना तशा अवस्थेत लोणीत आणण्याचा निर्णय घेतला.
या तिघांसाठी जवळ जायचे असले तरी हेलिकॉप्टर वापरतात. मात्र, बाळासाहेबांना त्रास देण्याच्या उद्देशाने रुग्णवाहिकेतून आणले.
मोठा भाऊ म्हणून वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा आपला अधिकार होता. मात्र राधाकृष्ण यांनी तो हिरावून घेतला.
यासाठी गावातील ब्राम्हण तयार नव्हते म्हणून पुणतांब्याहून आणले. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या ताब्यातील संस्था काढून घेतल्या. त्यासाठी कोर्टात वडिलांच्या सह्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले होते.
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार
- महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर
- 10% मुंबई आहे बापाची ! ‘हे’ कुटुंब आहेत मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, 3400 एकर जमिनीचे मालक
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ दोन वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 750 रुपयांची शिष्यवृत्ती
- …….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !