अकोले :- तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (३६) या तरुण शेतकऱ्याने २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना मृताकडे एक चिठ्ठी मिळून आली होती. यातील मजकुरावरून एक आरोपी विलास दादाजी गोसावी यास अटक केली.

त्याला न्यायालयानेसहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुतडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यासह अन्य आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी मृत शेतकऱ्याजवळल मिळालेल्या चिठ्ठीतील मजकूराबाबत मृताचे नातेवाईकांना अंधारात ठेवून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
या घटनेला आता पाच दिवस उलटल्यावर मृताच्या भावजय व नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांनी या घटनेतील मृत शेतकरी आरोटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींची नावे पोलिसांना दिली.
- PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ! योजनेची रक्कम दुप्पट होणार ? कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची मोठी माहिती
- महिला असो किंवा पुरुष साऱ्यांना मिळणार 1500 रुपये महिना ! दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राज्य शासनाची नवीन योजना
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार मोठा बदल
- आजपासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार! गणरायाच्या कृपेने मिळणार जबरदस्त यश, नशीब 100% साथ देणार
- महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण ! महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जाणार मार्ग













