अहमदनगर :- नगरचे तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे नगरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी नगर शहराचे तापमान ४५ अंशांवर गेले होते. त्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.


मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पारा वाढला आहे. गुरुवारी नगरचे तापमान ४० अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी त्याच काहीशी वाढ झाली होती.

तापमानाचा पारा वाढताच उकाडा ही प्रचंड वाढला आहे. उकाडा वाढला असताना शनिवारी नगर शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नगरकर घामाघूम झाले होते.
- सोन्याच्या दरांनी मोडला विक्रम; १० ग्रॅम सोनं थेट १.६ लाखांवर, लग्नसराईत ग्राहकांना मोठा फटका
- Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition सादर; मिलानो कोर्टिना विंटर ऑलिंपिक्स 2026 साठी खास स्मार्टफोन
- एसबीआय म्युच्युअल फंड IPO ची लिस्टिंग २०२६ मध्ये होणार; काय आहे प्लॅन?
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता रखडला; २.८४ लाख शेतकरी प्रतीक्षेत
- भारत-ईयू मुक्त व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम; शेअर बाजार पुन्हा तेजीच्या रुळावर













