संगमनेर :- बारावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्येतून एका विद्यार्थ्यांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमरास संगमनेर तालुक्यातील नांदुरी येथे घडली. सौरभ बाळासाहेब लांडगे (वय-१७ रा. नांदुरी दुमाला) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

राज्यात आज बारावीचा निकाल जाहिर झाला. नांदुरी येथील सौरभ लांडगे याने बारावीची परिक्षा दिली होती. बारावीत नापास झाल्याने सौरभला नैराश्य आले.
त्याने नांदुरी येथील सिताराम शेटे यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी सौरभला बाहेर काढून घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
- PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी ! योजनेची रक्कम दुप्पट होणार ? कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची मोठी माहिती
- महिला असो किंवा पुरुष साऱ्यांना मिळणार 1500 रुपये महिना ! दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राज्य शासनाची नवीन योजना
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार मोठा बदल
- आजपासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार! गणरायाच्या कृपेने मिळणार जबरदस्त यश, नशीब 100% साथ देणार
- महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण ! महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जाणार मार्ग













