राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.
मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ उडली आहे.

सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे संदीप दिवाकर कवाणे यांच्या शेतातील एअरवॉलजवळ महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.
याठिकाणी उषा साईनाथ शिंदे यांची मुलगी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी गेली. यावेळी तिच्याबरोबर मंगल संदीप कवाणे, संदीप दिवाकर कवाणे, शोभा प्रकाश कवाणे यांनी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी उषा शिंदे गेल्या असता मंगल कवाणे हिने त्यांचे केस धरून तसेच डाव्या कानातील टॉप्स जोरात ओढल्याने उषा शिंदे यांचा कान तुटून त्या जबर जखमी झाल्या. याप्रकरणी उषा शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
- 2005 च्या हिंदू वारसा (दुरुस्ती) कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला मालमत्तेत वाटा मिळतो का ? सुप्रीम कोर्टाचे आदेश काय सांगतात?
- मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठे गिफ्ट ! ‘या’ जिल्ह्यातुन चालवची जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- Post Office च्या RD योजनेत 5 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा सविस्तर
- आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार ? कर्मचाऱ्यांना आणखी किती महिने वाट पाहावी लागणार?
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानचा 21 वा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार ! समोर आली मोठी अपडेट