संगमनेर :- मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मंत्रिपद स्वीकारण्यास मी तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याने भाजप प्रवेश केवळ औपचारिकता राहिल्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी सांगितले.

काँग्रेस नेत्यांनी आता स्वत:हून बाजूला होत नव्यांना संधी देण्याची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता अंगुलीनिर्देश केला.
एका खासगी कार्यक्रमासाठी संगमनेरमध्ये आलेले विखे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तारात मिळणाऱ्या संभाव्य पदाबाबत छेडले असते ते म्हणाले,
माझा भाजप प्रवेश हा काही आता मुद्दा राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दिवस कोणता असेल आणि कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.
काही दिवसांपूर्वीच आपण विराेधी पक्षनेतेपदाचा आणि आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पक्षात आपली कोंडी केली, तेथे आपली घुसमट होत होती, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.
- रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! आता प्रत्येक ५ वर्षांनी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार, नाहीतर….
- ब्रेकिंग : केवायसी केली तरी सुद्धा ‘या’ महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ! ‘हे’ शेतकरी राहणार कर्जमाफी पासून वंचित
- आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही ! घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
- फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी मोठा निर्णय ! Home Loan आणखी स्वस्त होणार













