श्रीगोंदे :- जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला,
अशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.
१५ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली.
आरोपीने महिलेस धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
१६ जुलैला सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादीच्या पतीस गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे यांनी मारहाण केली.
महिला पतीस सोडवण्यासाठी गेली असता भाऊसाहेब गोलांडेने मिरची पावडर तिच्या डोळ्यात टाकली आणि खाली पाडून मारहाण केली.
पतीचे हातपाय बांधून राजीव गोलांडे व भाऊसाहेब गलांडे यांनी पिकअपमध्ये टाकून मारहाण करत बेलवंडी पोलिस ठाण्यासमोर आणून पोलिसांसमोरही मारहाण केली.
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. पीडिताला मारहाण झाली असताना पोलिसांनी उलट फिर्यादीलाच अटक केली.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ