श्रीगोंदे :- पंधरा दिवसांच्या आत एफआरपी देण्याचा नियम असताना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यामुळे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट थकवले. कायदा पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी झटकल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांची भीक मागण्याची वेळ आली, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे केला.
गेल्या तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह ऊस उत्पादकांचे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप आणि साईकृपा कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरु आहे.
पाटील यांनी तेथे भेट देऊन राज्यभरातील शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या वेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, युवराज चिखलठाणे, संदीप कुनगर, घनश्याम गोडसे, दिलीप वाळुंज, दिलीप लबडे उपस्थित होते.
- सोने 35 टक्क्यांनी घसरणार, चांदीची किंमतही कमी होणार ! लक्ष्मीपूजनापर्यंत सोने स्वस्त होणार का ? तज्ञांचा मोठा अंदाज
- एका शेअरवर मिळणार 24 Bonus Share ! ‘या’ कंपनीची मोठी घोषणा
- ‘हा’ 73 रुपयांचा शेअर पुढील बारा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल!
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी Dividend मिळवण्याची शेवटची संधी ! किती लाभांश मिळणार?
- दिवाळीत कोणते शेअर्स खरेदी करायला हवेत ? वाचा सविस्तर