जळगाव :- सुरत येथील तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तेथील तरुणांनी जळगावातील एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी दुपारी ही घटना घडली, तर मंगळवारी पहाटे जखमी तरुणाचा मृत्यू झाला.
रितेश सोमनाथ शिंपी (१८, रा. खडके चाळ, शिवाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रितेश हा कानुबाई उत्सवासाठी शनिवारी रात्री सुरत येथे मावशीकडे गेला होता. नवागाम डिंडोली येथे त्याची मावशी राहते.

दरम्यान, याच परिसरातील काही तरुण रितेशसोबत सतत वाद घालत असत. सुरत येथील एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा आरोप तेथील तरुण करत होते. रितेशने या तरुणीशी संबंध ठेवू नयेत, सुरतमध्ये येऊ नये, अशा धमक्या त्यांनी दिल्या होत्या.
मात्र, कानुबाई उत्सवानिमित्त रितेश शनिवारी रात्री सुरतला गेला होता, तर सोमवारी कानुबाईच्या विसर्जन मिरवणुकीत दुपारी नाचताना तरुणांनी रितेशला मारहाण केली. यातील एकाने थेट रितेशच्या पोटात चाकू खुपसला.
नंतर गंभीर अवस्थेत नागरिकांनी त्याला सुरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात