श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













