पारनेर :- तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आली.
आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. गुणोरे, ता. पारनेर) ही मयतांची नावे आहेत.
यातील एक मुलगा दिव्यांग असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. बडे कुटुंबीयांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, रात्री नेहमीप्रमाणे बडे कुटुंबीय जेवण करून झोपले होते. आज सकाळी शेजारी राहणाऱ्यांनी पाहणी केली असता कुटुंबातील चौघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
- ‘या’ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डिसेंबर महिन्याचा पगार कापला जाणार ! महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी
- शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी….! शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता हवा असल्यास इथं अर्ज करा, अर्जासोबत ‘ही’ कागदपत्रे जोडा
- महाराष्ट्रातील ‘हा’ चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार ! प्रस्ताव झाला मंजूर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
- 5 डिसेंबर नंतर आता महाराष्ट्रातील शाळा 9 डिसेंबरला सुद्धा बंद राहणार ! शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट
- देशभरातील शेतकऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी मान्य होणार ! PM नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, वाचा….













