उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेलं आहे, ते जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर मला खात्री आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील मावळे शरद पवार यांच्या विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रवादीसोबत राहतील आणि पक्षाची साथ सोडणाऱ्या फुटिरांना पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांनी कडाडून टीका केली.

वाशी (जि. उस्मानाबाद) येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, १५ वर्षे तुम्ही मंत्रिमंडळात होता, आता थोडासा पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागले. जेव्हा महाराष्ट्रात फंदफितुरी झाली आहे, तेव्हा त्यांना प्रायश्चित झालं आहे.
म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात कोणी फितुरी केली तर त्यांचा पाडाव करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला निवडून द्या, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.
- 8 जानेवारीपासून हवामानात मोठा बदल, काही भागात कडाक्याची थंडी अन् काही भागात धो धो पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज
- HDFC Life, डाबर इंडियासह ‘हे’ 3 शेअर्स गुंतवणूकदारांना देणार जबरदस्त रिटर्न! टॉप ब्रोकरेज हाऊसकडून मिळाली बाय रेटिंग
- 60 टक्क्यांची घसरण झालेल्या ‘या’ शेअर्समध्ये आशिष कचोलियांची मोठी गुंतवणूक ! आता शेअर्समध्ये आली तुफान तेजी
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! किमान पेन्शनमध्ये तब्बल पाचपट वाढ होणार, प्रस्तावाला लवकरच मिळणार मंजुरी
- मकर संक्रांतीच्या दिवसापासून ‘या’ राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार ! हातात येणार भरपूर पैसा, गाडी अन बंगल्याचे स्वप्न पण पूर्ण होणार













