अहमदनगर : आज जे स्वार्थी लोक पक्षांतर करत आहेत ते कुठेच टिकणार नाहीत. काँग्रेस पक्षातून असे लोक बाहेर पडत असले तरी पक्ष पुन्हा मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाची उभारणी सामाजिक चळवळीतून झालेली असून याच चळवळीच्या माध्यमातून पक्षाने देशात काम केले आहे.
आज देशावर मोठे संकट आलेले असून जेव्हा लोकांना हे संकट समजेल तेव्हा देश उध्वस्त झालेला असेल. त्यामुळे देशावर आलेले भाजप सरकारचे संकट तळागाळातील लोकांना समजून सांगावे. भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक बनल्याचे प्रतिपादन आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण गुरुवारी (दि.२९) पार पडले. यावेळी आ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. दादा पाटील शेळके होते. कार्यक्रमास पक्षाचे निरीक्षक योगेंद्र पाटील,
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे, सुनीता ढगे, आबासाहेब कोकाटे, बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.. पुढे बोलताना आ. तांबे म्हणाले, आपला देश तत्वप्रणालीवर चालणारा आहे.
देशात आतापर्यंत जे बदल घडून आले आहेत ते केवळ काँग्रेसमुळेच घडले आहेत. परंतु भाजप-शिवसेनेची सत्ता केंद्रात आणि राज्यात आल्यापासून अनेक चांगल्या योजना बंद झाल्या आहेत. काँग्रेसने आणलेल्या योजनांची नावे बदलून त्या राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! E-Kyc साठी आता ‘ही’ अट पण झाली शिथिल
- गॅस ग्राहकांसाठी आनंदाची ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरचे रेट झालेत कमी
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश! आता….
- पश्चिम रेल्वेचा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ 9 स्थानकातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार खरंच दुप्पट होणार का ? ‘ही’ सिक्रेट गोष्ट कोणीचं सांगणार नाही तुम्हाला













