संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील बोटा माळवाडी परिसरात शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री भूकंपसदृश्य सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही असे धक्के वारंवार बसलेले आहेत.
गेल्या काही वर्षापासून बोटा परिसरासह आजूबाजूच्या गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. तर काही धक्के मोठे बसलेले असल्याने त्या धक्क्यांची नोंदही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापक यंत्रावर झाली आहे.

त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी बोटा परिसरात येवून नागरिकांना घाबरून जावू नका, असे आवाहनही त्यावेळी केले होते. कालांतराने धक्के बसण्याचेही बंद झाले होते. मात्र, लोकांच्या मनामधून भीती जात नव्हती.
माळवाडीचे काही लोक घराबाहेर ताडपत्रीचे तंबू ठोकून रात्रीच्या वेळी त्यामध्ये झोपत. आता पुन्हा भूकंपसदृश्य धक्के बसण्यास सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून हे धक्के बसण्यास सुरुवात झाली होती. रात्री पुन्हा दोन सौम्य धक्के बसले होते. त्यामुळे काही नागरिकांना धक्के जाणवले, तर काहींना जाणवले नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोटा गावचे सरपंच विकास शेळके यांनी याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली.
- प्रतीक्षा संपली ! मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला धावणार Bullet Train
- ब्रेकिंग ! केंद्र पाठोपाठ ‘या’ राज्यात स्थापित झाला आठवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- मुंबई ते नाशिक प्रवास होणार वेगवान ! तयार होणार १३१ Km लांबीचा नवा रेल्वेमार्ग, या गावांमधून जाणार नवा मार्ग
- ……तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही ! नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच फडणवीस सरकारचा दणका
- ब्रेकिंग ! नव्या वर्षात मुंबईसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी, महाराष्ट्रात किती दिवस राहणार पावसाचे सावट?