कर्जत – कर्जत-जामखेडमधील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या.
हा पहिलाच टप्पा असून यापुढील काळातही नोकरीसाठी शिबीरे व मेळावे घेणार असल्याचे सांगत ही अखंड प्रक्रिया सुरू राहील असे आश्वासन आयोजक रोहित पवार यांनी युवक-युवतींना दिले.

कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झालेल्या थेट नोकरी मेळाव्यात राज्यभरातील वेगवेगळ्या 50 कंपन्या सहभागही झाल्या होत्या. तर 5 हजार 70 उमेदवार या मेळाव्यासाठी येथे आले होते.
गर्दीचा प्रतिसाद या मेळाव्यात मोठा मिळाल्याने रोहित पवार यांनी नोकरी मिळणे बाबतची संख्या मोठी असल्याने यापुढील काळातही वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांशी संपर्क साधून या दोन तालुक्यात ही प्रक्रिया सातत्याने राबविण्याचा निर्णय घेतला.
आज सहभागी झालेल्या कंपन्यांच्या मार्फत यापुढील काळातही कर्मचाऱ्यांची भरती या परिसरातूनच होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कर्जत व जामखेड परिसरातील तरुण व तरुणींसाठी या ठिकाणीच करियर प्लॅनिंग शिबिरही होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
- महाराष्ट्र राज्य शासन ‘या’ गावांमधील नागरिकांना वाटणार 5,000 कोटी ! प्रत्येकजण होणार करोडपती, कसा आहे नवा प्रकल्प?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी अपडेट ! PM मोदी 3 Vande Bharat ला दाखवणार हिरवा झेंडा, कसे असणार रूट?
- सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आता एक तोळा सोने खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक साडेसात हजार रुपये
- गुड न्यूज ! आजपासून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, तिरुपतीला जाणे होणार सोपे, राज्यातील ‘या’ आठ रेल्वे स्टेशनवर घेणार थांबा













