राजूर : पोलीस प्रशासन व ग्रामस्थात समन्वय असल्यास गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वास वैभव पिचड यांनी अकोले तालुक्यातील राजूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीला मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजूर येथील शासकीय विश्रामगृहावर ग्रामस्थ, मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार व शांतता कमिटी यांची बैठक मा. आ. वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच संतोष बनसोडे, पं. स. सदस्य दत्तात्रय देशमुख, माजी सरपंच गणपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब लहामगे, श्रीराम पन्हाळे,
श्रीनिवास येलमामे, काशिनाथ भडांगे, दीपक देशमुख, शेखर वालझाडे, नीलेश साकुरे, दौलत देशमुख, नंदूबाबा चोथवे, राजेंद्र चोथवे, राजू वराडे, माधवराव गभाले, आयुब तांबोळी, शमशुद्दीन तांबोळी, सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.. माजी आ. पिचड म्हणाले, राजूर येथे मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलेला प्रकार हा दुर्दैवी होता.
मागील चाळीस-पन्नास वर्षात येथे सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून गणेशोत्सव व मोहरमसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहेत. मागील वर्षी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून ती गैरसमजुतीमुळे घडली आहे. पोलिसांबरोबरच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक शांततेत व वेळेत कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, मागील वर्षीच्या दुर्दैवी घटनेने राजूर हे अतिसंवेदनशील म्हणूनप्रशासनाचे लक्ष आहे. राजूर ग्रामस्थ शांतताप्रिय असणारे असून ते पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील व गणेशोत्सव शांततेत पार पाडतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही.
हा उत्सव शांततेत व कोर्टाने दिलेल्या दिशा व निर्देशानुसार वेळेचे भान ठेवून साजरा करा. शांतता कमिटी व पोलीस प्रशासन यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करतील.
- नाशिक ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरू झाली इलेक्ट्रिक बस, वेळापत्रक अन तिकीट दर पहा….
- चारचाकी वाहन शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार देणार 5000 रुपयांचे अनुदान, कुठं करावा लागणार अर्ज?
- समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ 3 दिवस महामार्ग बंद ठेवला जाणार, कारण काय?
- यावर्षी सोन्याच्या किमतीत 70% आणि चांदीच्या किमतीत 150 टक्क्यांची वाढ ; 2026 मध्ये सोन आणखी किती वाढणार ?
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! OYO चा IPO येणार, महत्त्वाच्या प्रस्तावाला मिळाली मंजुरी, वाचा डिटेल्स