लखनौ : उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर रविवार (१ सप्टेंबर)पासून बंदी लागू झाली आहे.
राज्याच्या या आदेशानुसार बंदी असलेल्या पिशव्या खरेदी किंवा विक्री केल्याचे आढळून आल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो, असे राज्य सरकारने जाहीर केलेले आहे.

याबाबतच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी २६ ऑगस्ट रोजी सरकारच्या वतीने परिपत्रक काढून १ सप्टेंबरपासून उत्तर प्रदेशात ५० मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लागू झाली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच ज्या भागात अशा प्लास्टिक पिशव्या सापडतील अशा पोलीस ठाण्याचे प्रमुख, नागरी अधिकारी, व्यवसाय कर अधिकारी, दंडाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटलेले होते.
यानंतर रविवार (१ सप्टेंबर)पासून ही बंदी लागू करण्यात आलेली असून, बंदी असतानाही कुणी वापर करत असल्यास याची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आपली नावे गुपीत ठेवली जातील. यासाठी लखनौ पोलिसांनी हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे.
- सोन्याच्या दरांनी मोडला विक्रम; १० ग्रॅम सोनं थेट १.६ लाखांवर, लग्नसराईत ग्राहकांना मोठा फटका
- Samsung Galaxy Z Flip 7 Olympic Edition सादर; मिलानो कोर्टिना विंटर ऑलिंपिक्स 2026 साठी खास स्मार्टफोन
- एसबीआय म्युच्युअल फंड IPO ची लिस्टिंग २०२६ मध्ये होणार; काय आहे प्लॅन?
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता रखडला; २.८४ लाख शेतकरी प्रतीक्षेत
- भारत-ईयू मुक्त व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम; शेअर बाजार पुन्हा तेजीच्या रुळावर













