नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बनविण्याची व मध्य प्रदेशच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी देण्याची तयारी केली आहे; परंतु चव्हाण यांनी या दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारण्यास नकार देत आपण महाराष्ट्रात खूश आहोत, आपल्याला राज्यातच ठेवावे, असे म्हटले असल्याचे वृत्त आहे.
याबाबतच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदला, असा सल्ला शरद पवार यांनी राहुल गांधींना दिला होता.
- मुकेश अंबानीच्या अँटिलीया बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना मिळतो 2 लाख रुपयांपर्यंत पगार; नोकरी कशी मिळणार ? वाचा सविस्तर
- महाराष्ट्र चीन आणि स्वित्झर्लंडचा रेकॉर्ड मोडणार ; जगातील सर्वाधिक लांब काचेचा पूल महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार !
- मुंबई ते हैदराबाद प्रवास होणार वेगवान ! महाराष्ट्रात तयार होणार नवा सुपरफास्ट एक्सप्रेस हायवे
- काय सांगता ! चक्क 500 वर्षानंतर तयार होतोय एक नवीन राजयोग, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
- शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक आला मोठा ट्विस्ट ! CM देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला महामार्गाचा नवीन अलाइनमेंट













