शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













