जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आनला.
येथे डॉ.युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या वेळी संदेश कोठारी, दत्ता वराट, खंडु कवादे यांनी मदत केली. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
- वाईट काळ संपला ! 20 ऑक्टोबर पासून ‘या’ राशीच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार
- महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हफ्ता, बोनसही झाला मंजूर
- 10% मुंबई आहे बापाची ! ‘हे’ कुटुंब आहेत मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार, 3400 एकर जमिनीचे मालक
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ दोन वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 750 रुपयांची शिष्यवृत्ती
- …….तर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार !