नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना व मित्रपक्षाच्या महायुतीचाच विजय होईल. रिपब्लिकन पक्षाने १० जागांची मागणी केली असून रिपाइं भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही.
आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढू, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी नागपुरात आले असता आठवले यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल. महायुतीला २४० जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. भाजपाच्या विजयात रिपाइंचाही वाटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील धार बोथट झाल्यामुळे विरोधक आता ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सत्ता आली तेव्हा कुणीच यावर बोलले नाही.
मात्र, केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा ईव्हीएमविरोधात विरोधक बोलू लागले. निवडणुका मतपत्रिकेवर घ्यायच्या की ईव्हीएमवर घ्यायच्या हा निर्णय निवडणूक आयोगाला करायचा असल्याचेही आठवले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! रिंगरोड प्रकल्पाचा ‘हा’ महत्वाचा टप्पा 24 महिन्यात पूर्ण होणार
- शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी ! महाराष्ट्रासह संबंध देशभरातील शाळांमध्ये ऑस्ट्रेलिया पॅटर्न लागू होणार ?
- महाराष्ट्रातील ‘या’ 11 रेल्वे स्थानकांमधून नवीन रेल्वेगाडी ; ओडिशा आणि गुजरातला जोडणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ
- 1600 रुपयांचा स्टॉक एका दिवसात 1500 रुपयांवर ; मुकेश अंबानीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये आठ महिन्यातील सर्वात मोठी घसरण, कारण…
- ण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! पुण्यातून 60 नवीन लोकल गाड्या सुरू होणार, रेल्वेचा मेगाप्लॅन काय सांगतो?













