मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.

आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ
- मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची 750 एकर जमीन सक्तीने ताब्यात घेतली जाणार
- एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुड न्यूज ! एसटी महामंडळाने सुरू केली खास योजना, फक्त 585 रुपयात….
- म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचा मुहूर्त लांबला! आता ‘या’ महिन्यात निघणार सोडत, म्हाडाने दिली मोठी माहिती
- तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत अकाउंट ओपन करा, प्रत्येक तीन महिन्यांनी मिळणार 61 हजार 500 रुपयांचे व्याज