नवी दिल्ली :- मध्य प्रदेशात काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षात जाेरदार वादाला सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद सुटावा यासाठी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दुसरे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीला बोलावले आहे.
विशेष म्हणजे हा वाद चिघळू नये म्हणून सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना वेगवेगळे बोलावले आहे. सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना मंगळवारी चर्चेसाठी बोलावले आहे, तर बुधवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बोलावले आहे.

कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थन असलेल्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची सोनिया गांधी यांची इच्छा आहे. मात्र, असा नेता शोधणे सध्या तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना कठीण झाले आहे.
- 100000 रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ बिजनेस ! दरमहा होणार हजारो रुपयांची कमाई
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार ! 550 KM चा प्रवास आता फक्त 7 तासात
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार सोयाबीन खरेदी
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळणार 2 हप्ते?
- म्हातारपणात पण पैशांची तंगी भासणार नाही! Post Office च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास दरमहा मिळणार 20 हजार रुपये व्याज













