नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुटुंबात स्विकार करावा यासाठी धर्मांतर करणाऱ्या तरुणाविषयी शंका घेत पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही परंतू तरुणाने मनापासून तरुणीचा स्विकार केला असेल तर तरुणीच्या कुटुंबियांनीही त्याला स्विकारायला हवे असा सल्ला देत धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्याभरासाठी सुयोग्य पती बन असा मौलिक सल्ला दिला.
छत्तीसगडमधल्या तरुणीने मुस्लिम तरुणाशी आर्य समाज पध्दतीने विवाह केला. त्यानंतर तरुणाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन धर्मांतर केले. तरुणीच्या कुटुंबियांनी आपला स्विकार करावा यासाठी त्याने धर्मांतर केले. त्यानंतरही तरुणीच्या कुटुंबियांच्या त्याच्या निष्ठे विषयी संशय वाटत होता. हिंदू तरुणींना फसवण्यासाठी हा सापळा असल्याचे तरुणीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यासाठी तरुणीच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाचे न्या. अरुण मिश्रा यांनी, ‘समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही . सर्वांना तरुणीच्या भवितव्याची काळजी आहे.’ यावर तरुणीच्या पित्याच्या वकिलांनी हिंदू तरुणींना फसवण्यासाठी हा सापळा असल्याचे सांगितले. न्यायालयाने तरुणाला ओळख दर्शवणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ती तपासल्यानंतर त्याला, ‘आयुष्याभरासाठी सुयोग्य आणि एकनिष्ठ पती बन आणि चांगला प्रियकर बनून रहा’ असा सल्ला दिला.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













