पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षात जायचेच होते. त्यांनी इंदापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन आमच्यावर टीका केल्यानंतर मी त्यांना सुमारे पन्नास ते पंचावन्न वेळा फोन केले. मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत.
त्यांच्या पुण्याच्या घरी भेटायलाही गेलो. मात्र, ते भेटले नाहीत. त्यांनी भाजपात जायचे ठरवलेच होते, तर बिल आमच्या नावावर फाडत आहेत? असा पलटवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सोमेश्वर साखर कारखान्याने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, लोकसभेच्या जागा वाटपावेळी पाटील यांच्या घरी काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांशी आमची चर्चा झाली होती. त्यावेळी हर्षवर्धन यांनी विधानसभेची जागा मागितली होती.
यांवर इंदापूरच्या जागेबाबत शरद पवार व राहुल गांधी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशी चर्चा झाली होती. त्यामुळे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडू, असे आपण कधीच म्हणालो नव्हतो.
वास्तविक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांना थांबा म्हणत असताना ते भाजपात चालले आहेत. त्यामुळे त्यांनाच भाजपात जाण्याची घाई दिसत आहे. हर्षवर्धन पाटील व दत्तात्रेय भरणे या दोघांवर अन्याय न करता एकाला विधानसभा व एकाला विधान परिषद असा तोडगा काढता आला असता, असे पवार यांनी नमूद केले.
सरकारवर टीका करताना पवार म्हणाले, सरकार सध्या फक्तभावनिक राजकारण करत आहे. राज्यात पूरस्थिती असताना त्यांना मदत करायची सोडून राज्यकर्ते यात्रा करण्यात दंग आहेत. आमच्याकडेही पंधरा वर्षे सत्ता होती. आम्ही कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही.
मात्र, अलीकडे सरकार पैशाचे आमिष दाखवून नेते फोडत आहेत. ईडी, सीबीआयचा धाक दाखवून टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सरकारवर रोज टीका करायचे. मात्र, ईडीने त्यांची दिवसभर चौकशी केली, ते आता बोलत नाहीत.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात