बारामती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील भाषणानंतर काही अंतरावर उभ्या असलेल्या राष्ट्रवादी समर्थक युवकांनी ‘एकच वादा–. अजितदादा…’ अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार करत त्यांना ताब्यात घेतले.
मुख्यमंर्त्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन बारामती शहरात दुपारी साडेतीन वाजता झाले. या वेळी मुख्यमंर्त्यांच्या सभेपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे भाषण झाले. यानंतर मुख्यमंर्त्यांचे तेरा मिनिटांचे भाषण झाले.

या भाषणानंतर मुख्यमंत्री जनादेश यात्रेतील रथातून उतरून जात असताना काही अंतरावर असलेल्या युवकांनी एकच वादा… अजितदादा… अशा घोषणा दिल्या. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी काही युवकांवर सौम्य लाठीमार केला.
यानंतर घोषणाबाजी करणारे युवक पळाले. यातील काही युवकांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ युवकांनी ठाण मांडून घोषणाबाजी केली.
दरम्यान, मुख्यमंर्त्यांच्या जनादेश यात्रेत धनगर आरक्षण प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा देणारे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांना अगोदरच पोलिसांनी स्थानबद्ध केले होते.
- 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची
- काय सांगता! फक्त 60 मिनिटात पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला याल, ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन
- शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारच्या तिजोरीत पैसाचं उरला नाही ! महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे झाले बंद, पहा…
- नवीन वर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी, ‘या’ 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्राच हवामान कस राहणार?
- नवीन वर्षाआधी गोवा आणि राजस्थान दर्शनाला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय! महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन