दिल्ली : हवामानाचे देशातील बदलते स्वरूप पाहून सरकारने मान्सून सक्रिय होण्याच्या (१ जून) व तो परत जाण्याच्या (१ सप्टेंबर) तारखांत बदल करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे.
नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याच्या व ते परत जाण्याच्या तारखांची समिक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या गाडगीळ समितीने यासंबंधी सकारात्मक शिफारस केल्यास पुढील वर्षापासून मान्सूनच्या वेळापत्रकांत योग्य तो बदल केला जाईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

‘स्वातंत्र्यानंतर १९५० च्या दशकात हवामान विभागाने देशात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होण्याची तारीख १ जून व ते परतण्याची तारीख १ सप्टेंबर निश्चित केली होती. दर १० वर्षांनी या पूर्वनियोजित तारखांचा फेरआढावा घेतला जातो.
पण, अद्याप त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही’, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली
- ……मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने मान्य केली तर कांद्याला मिळणार चांगला दर! वाचा सविस्तर
- BEL Share Price: आज मोठा नफा मिळवण्याची संधी! तज्ञांची रेटिंग जाहीर; 1 आठवड्यात दिसली 6.53% ची तेजी
- Ashok Leyland Share Price: 3 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल! दिला 16.37% रिटर्न…आज कमावण्याची मोठी संधी
- आनंदाची बातमी! नोव्हेंबर महिन्यापासून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपयांचा लाभ
- महाराष्ट्रातील ‘या’ महापालिका कर्मचाऱ्यांना 20 टक्के अनुग्रह अनुदान !