मुंबई : देशात बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक कंपन्यांतून कामगारांना मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. सत्ता हातात असताना रोजगार वाढवण्याचे काम करण्याऐवजी केंद्र सरकारने रोजगार घालवण्याचे काम केले असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी भाजपा सरकारवर केली.
नवी मुंबईतील सीवूड्स येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत पवारांनी पक्षांतर करणाऱ्यांनाही लक्ष्य केले.

पवार म्हणाले की, संबंध देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर लागले आहे. इथे वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. सत्ता नसताना अडचणी आल्या, तर त्या दूर करण्याची हिंमत लागते, असा टोला त्यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.
आज १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात यासाठी गप्प बसायचे का? त्यांची चेष्टा करण्याचे काम आताचे सरकार करत आहे. ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली, त्यांच्या पंगतीत बसण्यामागे या नेत्यांचा काय दृष्टिकोन असावा? असा खोचक सवाल पवार यांनी केला.
- मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण ! मुंबईतील ‘या’ भागात लॉटरीविना म्हाडाचे घर मिळवण्याची सुवर्णसंधी
- आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळणार का ? महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट
- पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! एकूण तीन टप्प्यात पूर्ण होणार प्रकल्प, कसा आहे संपूर्ण रूट?
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू होणार का ? समोर आली मोठी अपडेट
- ब्रेकिंग : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ तीन बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण