सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे.
हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात आज आर्थिक मंदी आहे, रोजगार उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हे जनतेला दिवास्वप्न दाखवत सुट आहेत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- Reliance Power Share Price: रिलायन्स पॉवर शेअर करणार धमाल! एका दिवसात 3.51% रिटर्न…आज मिळेल प्रॉफिट?
- HDFC Bank Share Price: एचडीएफसी बँकेचा शेअर BUY करण्याचा तज्ञांचा सल्ला! 1 वर्षात दिले 15.58% रिटर्न… आज स्थिती काय?
- SBI Share Price: SBI शेअरमध्ये मोठी उसळी! BUY करावा का? तज्ञ म्हणतात की?…
- Bajaj Finance Share Price: तुमच्याकडे बजाज फायनान्सचा शेअर आहे? आज SELL कराल की HOLD? काय म्हणतात तज्ञ?
- DISHTV Share Price: 6 रुपये किमतीचा शेअर करणार मालामाल…1 आठवड्यात दिला 8.13% रिटर्न