मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे. सध्याच्या १२२ आमदारांपैकी २५ जणांचा ‘पत्ता कट’ होण्याची शक्यता भाजप सूत्रांनी वर्तविली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि संघाने संपूर्ण राज्यात ‘सर्व्हे’ केला आहे. त्या-त्या ठिकाणचे राजकारण, जनसंपर्काचा अभाव सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची टाळाटाळ आणि एकूणच कृतीशून्य व्यक्तिमत्त्व अशा पद्धतीच्या निकषांवर साधारण २५ आमदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यात नेमका कोणाचा नंबर लागणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

विधानसभेच्या या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेना ‘युती’कडून होणार आहे. सुरुवातीच्या काळात हे दोन्ही पक्ष ‘स्वबळा’वर लढतील असे राजकीय तज्ज्ञांना वाटत होते. पण, महायुती करूनच मोठा विजय मिळविण्याचे भाजपने नक्की केले आहे.
अशा परिस्थितीत महायुतीला महाराष्ट्रात २२९ जागा मिळतील असा ‘सर्व्हे’ सांगतो. प्रत्यक्षात यश कितपण मिळेल याचा शेवटी हा अंदाजच आहे. पण, अशा आकडेवारीवरून विरोधकांना खच्ची करण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडणार नाही, असे सांगण्यात येते.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात