अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत असताना अंबाजी-दांता मार्गावरील त्रिशुलिया घाटात ही ट्रॅव्हल्स उलटली. हा अपघात एवढा भीषण होता २१ जण जागीच ठार झाले. उर्वरित सर्व ५० जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून त्यामधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी रक्त, मांसाचा अक्षरश: सडा पडला होता. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या अपघाताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पावसामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी Good News ! ‘ही’ कंपनी एकाच वेळी देणार डबल बोनसचा लाभ
- दिवाळीनंतरही ऑफर्सचा धडाका सुरूच ! डीमार्टमध्ये ‘या’ वस्तूंवर मिळतोय 70% डिस्काउंट
- या बँका देतात 365 दिवसाच्या एफबीवर सर्वाधिक व्याज! FD करण्याआधी नक्की वाचा
- पुण्यातील ‘या’ प्राईम लोकेशनवर असणारे 90 लाखांचे घर आता फक्त 28 लाखात ! Mhada ने जाहीर केली नवीन लॉटरी
- महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली 3% महागाई भत्ता वाढ ! दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय













