मुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
सरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला असताना, सरकारबद्दल विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात या धोरणांवर भर दिला असल्याने त्याला परीक्षार्थीकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस युवकांचा जाहीरनामा ५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करत असून त्यात बेरोजगारीच्या प्रश्नांचा प्राधान्याने उल्लेख असल्याची माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा दिलासादायी निर्णय
- राज्यातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! सरकारचा परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय
- आनंदाची बातमी ! राज्यातील नागरिकांना पाणीपट्टी अन घरफाळामध्ये 50% सवलत मिळणार, फडणवीस सरकारचा निर्णय
- मध्यमवर्गीयांसाठी केंद्रातील सरकार घेणार मोठा निर्णय ! मिळणार 3 लाख रुपयांची आर्थिक सवलत?
- मुंबई हायकोर्टाचा नवा निर्णय चर्चेत ! वारसा हक्काने मिळालेल्या जमिनी बाबत मोठा निकाल