मुंबई : आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीतून राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी वरळी मतदारसंघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
तसेच शिवसेनेच्या पहिल्या यादीत आदित्य ठाकरेंचे नाव होते. . वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश माने यांना उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे.
मी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही माझा प्रचार करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर करताना शिवसैनिकांना केले होते. राष्ट्रवादीने सुरेश माने यांना वरळीमधून उमेदवारी दिली तर या दोघांमधील लढत रंगतदार होणार आहे.
- लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन! आ.तांबेंची तत्काळ अंमलबजावणी,पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता; नगराध्यक्षांसह नगरसेवक मैदानात
- मृत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्र्यांनी केले सांत्वन
- पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! शहरातील ‘या’ स्थानकांच्या नावांमध्ये झाला मोठा बदल
- पोस्टाची ‘ही’ योजना गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत, 5 वर्षात मिळणार 15 लाख रुपये, पहा डिटेल्स
- ‘या’ कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 80% पर्यंत रिटर्न ! 2026 मध्ये ‘हे’ 5 शेअर्स ठरतील वरदान