अहमदनगर – जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक आल्याने पावसाने उमेदवारांचा निरूत्साह झाला. भर पावसात इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. या पावसामुळे शक्तीप्रदर्शनाचा बेत हुकला.

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले हे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जतला येणार होते. मात्र, पावसामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत ते कर्जतला आले नव्हते. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र आज दुपारी बारा वाजता अचानक पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे इच्छुक उमेदवारांचे नियोजन कोलमडले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मिळून गुरुवारपर्यंत ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी गुरुवारी तब्बल ५२ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी दाखल करण्यास आज अखेरचा दिवस होता.
दि. २७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेत पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी नऊ व तिसऱ्या दिवशी सात अर्ज दाखल झाले होते.गुरुवारी चौथ्या दिवशी ५२ अर्ज आले.
अर्ज दाखल करणारांमध्ये वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, राजेश परजणे, डॉ. चेतन लोखंडे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, हर्षदा काकडे, शिवाजी कर्डिले, विजय औटी, नीलेश लंके, सुजित झावरे, संदेश कार्ले, रोहित पवार, अनिल राठोड, संग्राम जगताप, बबनराव पाचपुते अशा प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
- लाडक्या बहिणींसाठी Good News ! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
- वाईट काळ कायमचा निघून जाणार! ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल, मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार
- राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा