जळगाव:- दहावीच्या विद्यार्थिनीसह एका तरुणाचा पाळधी येथे खड्ड्यात मृतदेह आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली आहे. तरुण तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला हाेता, तर विद्यार्थिनीला पळवून नेल्याबाबत गुरुवारी रात्री १२ वाजता तिच्या वडिलांनी पाळधी पोलिसांत तक्रार केली होती.
त्यामुळे दाेघांची हत्या करण्यात आल्याचा संशय तरुणाचे मित्र आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. प्रिया ऊर्फ छकुली दत्तात्रय पाटील (१५, रा.माळीवाडा, पाळधी) आणि जयेश दत्तात्रय पाटील (१९, रा.नशिराबाद) अशी मृतांची नावे आहेत. प्रिया ही पाळधी येथील सरजूबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत हाेती. पाळधी-चांदसर रस्त्यालगतच्या वीटभट्टीजवळील सुमारे सात ते आठ फूट खड्ड्यात एका रखवालदाराला हे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. प्रियाजवळ घड्याळ व शाळेची बॅग तर जयेशकडे माेबाइल आढळून आला.

घटनास्थळी पाळधी येथील नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाळधी दूरक्षेत्राचे एपीयाय हनुमंतराव गायकवाड, सहायक फाैजदार नीलिमा हिवराळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पाेलिसांनी प्रियाच्या नातेवाइकांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर ते मृतदेह प्रिया व जयेशचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सुरू झाल्यात दोन नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ Railway Station वर थांबा मंजूर
- लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार पैसे ; ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सोबत जमा होणार का ?
- ब्रेकिंग : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निघालेत 3 महत्वाचे शासन निर्णय ( GR ), कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?
- 25 हजार रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रुपयांचे रिटर्न ! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर
- ‘ही’ सिमेंट कंपनी शेअरहोल्डर्सला देणार 80 रुपयांचा लाभांश! शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची नवीन संधी













