बीड : वंचित, ओबीसी बांधवांना मोदी सरकारच्या काळात संवैधानिक दर्जा मिळाला. त्यामुळे हा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. ७० वर्षांत जे पक्ष सत्तेत होते, त्यांनी विकास का केला नाही? असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला.
संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या कल्याणाचा सतत विचार केला. भाजप सरकार त्यांच्याच विचारांवर कारभार करत असल्याचे सांगून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग त्यांनी फुंकले.

संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मंगळवारी (दि.८) दसरा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास अमित शहा यांनी संबोधित केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भूपेंद्र यादव, विजय पुराणिक, पालकमंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, ओमराजे निंबाळकर, सुजय विखे पाटील यांच्यासह बीड व अहमदगनर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
- चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चिंताजनक ! चांदीच्या किमतीत 60 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता, वाचा सविस्तर…
- खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! केंद्रातील सरकारचा नोकरदारांसाठी मोठा निर्णय, ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार १५,००० रुपये
- जानेवारी महिन्याच्या ‘या’ तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसह खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार! राज्य शासनाचा निर्णय
- सरकार शेतकऱ्यांना देणार नवीन वर्षाची मोठी भेट ! पीएम किसानच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर
- LPG गॅसची सबसिडी आता कायमची बंद होणार ? केंद्रातील सरकार मोठा निर्णय घेणार ! वाचा savis