श्रीरामपूर :- मतदार संघाचे भवितव्य शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवसायाशी आहे. त्यावरच लहान मोठे व्यवसाय आणि बाजारपेठ चालते. या सर्व गोष्टींसाठी पाटपाणी हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे.
समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे आपले हक्काच्या पाण्यावर गदा आली असल्याने भविष्यात या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा असावा लागतो.

त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी आणि विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.भाऊसाहेब कांबळे यांना साथ देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये श्री. मुरकुटे बोलत होते.
मुरकुटे म्हणाले, सन १९९९ मध्ये केलेली चूक आता भोगावी लागत आहे. सन १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला. तालुक्याच्या हक्काचे पाणी गेले.
शेती उजाड; तर शेतकरी उद्ध्वस्त झाला. पाण्याअभावी केवळ शेतीच नाही, तर दूध व्यवसायालाही फटका बसला. बारमाही शेती जिरायती बनली आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतमजूर व गोरगरीबांचा रोजगार गेला.
पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडल्याची भिती आहे. या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारास साथ द्या.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! शासनाकडून लागू केल जाणार ‘हे’ नवीन धोरण, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?
- महाराष्ट्राला मिळणार 13वी वंदे भारत एक्सप्रेस ! ‘या’ 4 रेल्वे स्टेशनवर थांबणार नवीन Vande Bharat
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी सुद्धा मिळणार अनुदान, वाचा सविस्तर
- 2026 पुणेकरांसाठी ठरणार विशेष खास ! पुढील वर्षी सुरु होणार ‘हा’ महत्त्वाचा Metro मार्ग, कसा असणार रूट?
- देशाला मिळणार आणखी एका नव्या बुलेट ट्रेनची भेट ! कसा असणार रूट ?