चंद्रपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका नाही. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मंगळवारी चंद्रपुरात पत्रकारांशी बोलताना केला.
सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पुढे आली तर काँग्रेसचे नेते अस्वस्थ व्हायला लागतात. यामागील कारण अद्याप कळालेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दोनदा शिक्षा भोगणारे सावरकर हे एकमेव नेते होते.

मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर सतत अन्याय केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोपरांत न्याय मिळेल, असे शाहनवाज हुसेन यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर तेथील शांतता भंग होऊ नये म्हणून माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
- शासनाचा नवा निर्णय ! महाराष्ट्रातील ‘या’ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट ! 2026 च्या सुरुवातीलाच मिळणार ‘हे’ 2 मोठे लाभ
- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! राज्यातील ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत मोठा बदल, नवीन टाईम टेबल आत्ताच नोट करा
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! जामनगर – तिरूनेलवेली एक्स्प्रेस आणि पोरबंदर – तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला ‘या’ स्थानकावर थांबा मंजूर
- Tata पुन्हा मार्केट काबीज करणार ! 2026 मध्ये लॉन्च होणार तीन नवीन SUV