नगर : बहुजन समाजाला आज समाजात असणार स्थान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना दैवत मानणारा सर्व समाज आणि मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस सुनील शिंदे यांनी केले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजाला एक मोठी ओळख मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीने आपली ताकद दाखवून दिली.


इतर गटांनी राज्यात देशाचे संविधान पायदळी तुडवायला निघालेल्या मनुवादी सेना-भाजपला पाठिंबा दिला. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील या गटांचे नेते जरी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे सांगत फिरत असले तरी बहुजन समाजातील मतदार मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाचा पक्ष असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीशी ठामपणे उभे आहेत.
त्यामुळे येत्या २१ तारखेला कोणी कुणालाही पाठिंबा दिल्याचे सांगत असले तरी बहुजन समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला मतदान न करता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर शहराच्या विकासासाठी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या किरण काळे यांनाच शतप्रतिशत मतदान करेल आणि आपली संघटित ताकद दाखवून देईल असा ठाम विश्वास सुनील शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
- लाडक्या बहिणींसाठी Good News ! सप्टेंबर महिन्याचा हप्ता ‘या’ मुहूर्तावर खात्यात जमा होणार, वाचा डिटेल्स
- मोठी बातमी ! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवाभाऊंची मोठी घोषणा, आता महिलांना मिळणार बिनव्याजी 100000 रुपयांचे कर्ज
- वाईट काळ कायमचा निघून जाणार! ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होईल, मनातील अनेक इच्छा पूर्ण होणार
- राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा