औरंगाबाद – औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ओवेसी यांना हिरवा साप म्हटले होते. यासह त्यांनी लावलेला झेंडा उखडून फेकण्याचे आवाहन जाहीर सभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना शुक्रवारी ओवेसी म्हणाले की, मी लावलेला झेंडा काही बांबूत लावलेला नाही.
तो औरंगाबादकरांच्या मनात लावलेला असून तो यापुढे कायम राहणार आहे. भीतीचे राजकारण करून सत्ता भोगण्यात भाजप आणि शिवसेना अग्रेसर आहे. त्यांच्या भूलथापांना मतदारही बळी पडतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के हिंदू समाज भाजपच्या पाठीशी होता.

त्याचे प्रमाण २०१९ मध्ये ४४ टक्के झाले असून, सहा टक्के मुस्लिम मतदारांनीही त्यांना मदत केल्याचे आकडे खासदार ओवेसी यांनी सभेत मांडले. मात्र, वंचित समाजासह मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार हात आखडता घेते. त्यामुळे आपले प्रश्न, समस्या मांडण्यासाठी आपल्या माणसांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
- 1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 22 हजार रुपयांचे व्याज ! सरकारी बँकेची एफडी योजना ठरणार गुंतवणूकदारांसाठी फायद्याची
- काय सांगता! फक्त 60 मिनिटात पुण्याहून गोव्याला आणि गोव्यातून पुण्याला याल, ‘ही’ आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन
- शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारच्या तिजोरीत पैसाचं उरला नाही ! महाडीबीटी पोर्टलवर पूर्वसंमती देणे झाले बंद, पहा…
- नवीन वर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी, ‘या’ 5 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा, महाराष्ट्राच हवामान कस राहणार?
- नवीन वर्षाआधी गोवा आणि राजस्थान दर्शनाला जाणाऱ्या पर्यटकांची मोठी सोय! महाराष्ट्रातील ‘या’ स्थानकावरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन