रत्नागिरी : निवडणुकांच्या निकाल जाहीर होण्या आधीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय कदम हे खेड दापोलीचे उमेदवार आहेत. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाला. त्यानंतर त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु होती. यामुळे संजय कदम यांच्यावर पोलीस चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली.
मात्र त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा सुरु केली. दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळणार हा आर्थिक लाभ
- धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार का ? तज्ज्ञांचा सल्ला काय
- FD चा नाद सोडा ! Post Office च्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा अन मिळवा 4.5 लाखांचे व्याज
- ‘हे’ 5 शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करा ! 12 महिन्यात मिळणार 24 टक्क्यांचे रिटर्न
- सरकारी कर्मचाऱ्यांची दिन दिन दिवाळी ! दीपोत्सवात किती दिवस राहणार सुट्ट्या? समोर आली यादी