राहाता :- तालुक्यातील गोगलगांव येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.
रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत जमिनीत पेरलेले व्यवस्थित उगवले नाही. जे उगवले ते सध्याच्या अतिवृष्टीमुळे पदरी पडले नाही. यामुळे रवींद्र हा वैफल्यग्रस्त होता.

त्यातच दिवाळी सणाकरीता कुटूंबासाठी आणि बहीण, भाच्यांना काहीच घेण्याची ऐपत नसल्याने तो ताणतणावात होता. यातूनच गुरूवारी मध्यरात्री वृध्द आई घरात झोपल्यानंतर रवींद्र्रने घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेवून जीवनयात्रा संपविली.
- ‘या’ आहेत 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या Top 5 Car
- दिवाळीत बायकोच्या नावाने ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, प्रत्येक महिन्याला मिळणार 6 हजार 167 रुपयांचे व्याज
- पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेत 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- आनंदाची बातमी ! ‘या’ कारवर मिळतोय 52 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट
- ‘या’ 5 शेअर्समध्ये गुंतवणूक सुरु करा अन पुढील 12 महिन्यात दमदार रिटर्न मिळवा, आनंद राठीच्या पसंतीचे टॉप स्टॉक